कधी कधी नातं नात्यांत गुंतून जातं , अन त्याचा अर्थच बदलून जातो .
मग त्यांना आपण वेगवेगळी नाव शोधतो.
पण काही नाती अशीच राहतात ... एखाद्या अनामिकेसारखी .
ओळख नसून सुध्दा वेगळी .
काही नाती मैत्रीच्या नावाखाली खपून जातात.
तर काही भावना मात्र असतात.
आयुष्यात कित्येक नाती जुळतात , कित्येक तुटतात .
काही लादली जातात , काही आपसूक बनतात .
ह्या नात्यांचा अजब खेळ असतो .
जेव्हा वाटत जिंकलो , तेव्हाच सारं संपलेलं असत .
-- मीता मेहेर .
(२३.०५. १९९८)




